मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रातही या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, त्यासोबतच त्यांच्या संलग्नित ६ संघटनांवरही बदीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.
यावर माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले,’पीएफआयद्वारे फंडींगचे मॉडेल्सही तयार करण्यात आले होते. खूप अकाऊंट्स ओपन करायचे, या अकाऊंटमधून थोडा-थोडा पैसा आणायचा म्हणजे कोणाच्या लक्षातही येणार नाही, या सगळ्या गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत. म्हणूनच केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली असून महाराष्ट्रातही आम्ही सक्षम कारवाई करू, असेही फडणवीस म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले,’पीएफआय एक सायलेंट किलर होता, ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपली आर्मी आणि इंटेलिजन्स अलर्ट झालं आहे. त्यामुळे, थेट दहशवादी हल्ला करणं किंवा बॉम्बस्फोट करणं, याऐवजी अशी वेगळ्यापद्धतीने समोर एक मानवी चेहरा दाखवून पाठीमागे हवे ते कृत्य करायचे असे काम देशविघात शक्तींनी सुरु केली असेही ते म्हणाले.