पिंपरी – दोन्ही मुलीच झाल्या तसेच माहेरच्या लोकांनी कमी पैशांत लग्न उरकले या कारणांवर सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना थेरगाव येथे घडली. याप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासू निर्मला विजय ओव्हाळ (वय 55), सासरे विजय नामदेव ओव्हाळ (वय 60), पती सुशील विजय ओव्हाळ (वय 35), दिर सुजित विजय ओव्हाळ (वय 33), जाऊ वैशाली सुजित ओव्हाळ (वय 32), चुलत नणंद रितू प्रकाश कांबळे (वय 31, सर्व रा. पडवळनगर, थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. हा प्रकार 8 फेब्रुवारी 2010 पासून 15 मार्च 2020 या कालावधीत पडवळनगर, थेरगाव येथे घडला आहे.
फिर्यादी महिला सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी “तुझ्या आई-वडिलांनी नीट लग्न लाऊन दिले नाही. कमी पैशात लग्न उरकले,’ असे म्हणून दिर सुशील याच्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली.त्यानंतर फिर्यादी महिलेला दोन्ही मुलीच झाल्या. या कारणावरून वेळोवेळी उपाशी ठेऊन, शारीरिक व मानसिक छळ केला.