नवी दिल्ली : आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे तिसऱ्यांदा दिल्लीत सरकार स्थापन होणार आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला मिळलेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांची आभार मानले आहे.
‘आप’वर दाखवलेल्या विश्वासाबबद्दल मी दिल्लीकरांचे आभार मानतो. हा माझा विजय नसून दिल्लीतील जनतेचा विजय आहे असे अरविंद केजरीवाल म्हणाले. हि नवीन राजकारणाची सुरवात असून वीज, शिक्षण,आरोग्य आदी कामाचा विजय असल्याचेही ते म्हणाले.
दिल्लीच्या जनतेने मला त्यांचा मुलगा समजून विश्वास दाखवला. मी एकटा दिल्लीचा विकास करू शकत नाही, मला तुमच्या प्रेमाची तुमची साथ हवी आहे. आपण सर्वानी मिळून दिल्लीला विकासाच्या दिशेने नेऊया अशी साद त्यांनी जनतेला घातली.
माझ्या पत्नीचा आज वाढदिवस असून दिल्लीच्या जनतेने आम्हाला विजयाची भेटवस्तू दिली असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्ष ६३ जगावर आघाडीवर असून ७ जगावर भाजप आघाडीवर आहे.