लखनौ -बसपच्या प्रमुख मायावती यांनी शनिवारी दुसऱ्या कार्यकाळाची वर्षपूर्ती केलेल्या मोदी सरकारवर निशाणा साधला. देशातील जनतेचे आणि विशेषत: गरीब, बेरोजगार, शेतकरी, स्थलांतरित मजूर आणि महिलांचे जीणे अधिकच यातनादायी बनल्याचे त्यांनी म्हटले.
वर्षपूर्तीला मोदी सरकारकडून अनेक दावे करण्यात आले. मात्र, ते वास्तवापासून अंतर राखून असणारे नसते तर बरे झाले असते. वर्षभराचा कार्यकाळ अनेक वादांनी भरलेला होता. त्यामुळे सरकारने खुल्या मनाने आपल्या धोरणांचा आणि आपल्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्याची गरज आहे.
त्रुटी असतील तर त्या झाकण्याऐवजी दूर करायला हव्यात. देशाच्या आणि जनतेच्या भल्यासाठी सरकारला हा बसपचा सल्ला आहे, असे मायावती यांनी ट्विटरवरून म्हटले.