नवी दिल्ली – पद्म पुरस्कारासाठी लोकांनीही त्यांच्या समोरील प्रेरणादायी व्यक्तींची नावे सुचवावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केले आहे.
या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारतात अनेक लोक खूप चांगले काम करीत असतात. आपल्या बौद्धिक चातुर्याने ते लोकोपयोगी काम करीत असतात. पण अशा लोकांची माहिती फार ऐकू येत नाही.
तुम्हाला असे काम करणारे कोणी लोक माहिती आहेत काय? जर माहिती असेल तर लोकांनी 15 सप्टेंबरपर्यंत अशा व्यक्तींची माहिती पाठवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पद्म पुरस्कारांसाठी लोकांचे नामांकन महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कार जाहीर केले जात असतात.