गोंदिया : बंगालच्या जनतेने अमित शाह आणि मोदी यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे
देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शाह यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हा आम्ही राजीनामा देऊ, असे म्हटले होते. तेव्हा आता त्यांनी राजीनामा देण्याची वेळ आली आहे, असे मलिक म्हणाले.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अबकी बार 200 आकडे पार असे बोलून फेकाफेकीचे राजकारण केले. आता निवडणुकीच्या निकालाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.