कोल्हापूर – अतिवृष्टीमुळे गेली सहा दिवस कोल्हापूरात महापूर स्थिती निर्माण झाली. पूराच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहराचा चोहोबाजूनी संपर्क तुटला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपापर इंधन पोहचण्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे.
महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुताशं पेट्रोल पंप हे पाण्याखाली होते. पूराचे पाणी ओसरल्यानंतर कोल्हापूरातील काही भागात हळुहळु जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये पेट्रोलपंप सुरू झाले आहेत.
त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीस्वारांची पेट्रोलपंपावर तुफान गर्दी पहायला मिळत असून वाहनांच्या लांबच लाबं रांगा दिसत आहेत.
सर्वांना पेट्रोल मिळावे म्हणून पेट्रोल पंप धारकांकडून शंभर, दोनशे अशा टप्प्यात पेट्रोल दिले जात आहे.
पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन तास रांगेत उभे रहायला लागत आहे.