कोलकाता – प. बंगालमध्ये बोलपूर भागात झाला तसा रोड शो आपण यापूर्वी कधी पाहिला नाही, लोकांना आता परिवर्तन हवे आहे, असे मत भारीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्याच बरोबर राजकीय हिंसाचारात भाजपाच्या 300हून अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. भाजपाला एकदा संधी दिल्यास सोनार बांगला बनवू असेही ते म्हणाले.
बंगालमध्ये रविवारी बोलपूर भागात काढलेल्या रोड शो मध्ये भाजपाचा झंझावात दिसून आला.काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांवर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर ज्याप्रकारे हल्ला केला त्याचा भाजपा आणि मी वैयक्तिकरित्याही त्याचा निषेध करतो. हिंसाचाराचं उत्तर लोकशाही पद्धतीने देणार असल्याचे आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे, असेही शहा म्हणाले.
अशाप्रकारच्या कोणत्याही हल्ल्यांमुळे भाजापाची गती मंदावेल किंवा भाजपा कार्यकर्ते थांबतील या भ्रमात तृणमूल कॉंग्रेसनं राहू नये. तुम्ही जेवढं हिंसक वातावरण त्या ठिकाणी तयार कराल तेवढंच भाजपा आणखी योग्यप्रकारे बंगालमध्ये स्वत:ची स्थिती मजबूत करण्याचं काम करेल. हिंसाचाराला आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं उत्तर देऊ आणि येणाऱ्या निवडणुकांध्येही उत्तर देऊ, असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी जे पैसे दिले ते सर्व गायब झाले. सीएजी ऑडिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात का धाव घेतली जात आहे. भ्रष्टाचार झालाय म्हणूनच पळवाट शोधली जात आहे. आपल्याच माणसांनी तो भ्रष्टाचार केलामुळे त्यांना पकडण्याची हिंमतही होत नसल्याचं ते म्हणाले.
टीएमसी आणि कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुवेंदु अधिकारी यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. अन्यायाच्या विरोधात ज्यांना आवाज उठवायचा आहे त्यांनी भाजपात यावे. काल आमचे सर्व पोस्टर्स फाडण्यात आले. परंतु आज मोठ्या प्रमाणात लोकं जमली. मी लोकांचा आभारी आहे, असंही शाह म्हणाले.