आगामी काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2.80 लाख रुपये जमा होऊ शकतात. सरकार लवकरच या निर्णयाची घोषणा करु शकते.
1 जानेवारी 2020 आणि 1 जुलै 2020 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम देण्यावर स्थगिती दिली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्याचं आणि निवृत्ती वेतन धारकांचं मोठं नुकसान झालं होतं.
एकीकडे हे महागाईचा फटका बसत आहे आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 18 महिन्यांपासून मिळालेलाच नाही. त्यामुळे 10 हजार ग्रेडवाल्या पगाराच्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी जवळपास 2.88 लाख रुपयांचं नुकसान झालंय.
त्यामुळे आगामी काळात सरकारने वाढीव DA सह या कर्मचाऱ्यांची थकित देय रक्कम अदा केल्यास प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात 2.88 लाख रुपये जमा होतील. यात वाढीव महागाई भत्ता 28 टक्क्यांनी मिळणे अपेक्षित आहे.