नगर –मुख्यमंत्र्यांनी सुचनादिल्यानंतर जिल्हाधिकारी, जि.प.कृषी विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने पंचनामा करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असतांना पंतप्रधान पिक विमा योजनेतील विमा धारकांचे सुमारे पन्नास हजार पिकविमा मागणी करणारे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विमाकंपनीचे प्रतिनिधी विनायक पवळे यांनी दिली.
विमा मागणी अर्जाची संख्यापाहता झालेल्या नुकसानीचा अंदाज बांधता येवू शकतो ,मात्र प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम हाती घेतले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करून विम्याचे प्रस्ताव पुढे पाठविंण्यात येतील असेही पवळे यांनी सांगितले. यंदा जिल्ह्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरले आहेत त्यांची संख्या पाच लाख 97 हजार एव्हढी आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे सुमारे साडेतीन लाख हेक़्टरजमीनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये 33. टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र 3 लाख 24 हजार 643 हेक्टर तर 33 टक्केपेक्षा कमीनुकसान झालेल्या 39 हजार 371 हेक्टर इतके नकसान झाले पावसाचा 1 हजार 519 गावांना फटका बसला आहे. यावर्षी खरिपाची 5 लाख 91 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसामुळे यावर्षी पिके चांगली जोमात आली होती.मात्र ऐन हंगामाच्या सुगीच्या दिवसात जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी व अवकाळी झालेल्या पावसाने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे15-20दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हंगामातील पिकाची प्राथमिक पाहणी कृषी विभाग व महसूल विभागाने केली आहे.
या प्राथमिक पहाणीमध्ये जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 519गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीमध्ये 33 टके पेक्षा जास्त व 33 टक्के पेक्षा कमी अशी वर्गवारी करत अहवाल गुरुवारी जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पुढील आठवडाभरात कृषी आणि महसूल विभाग शेतीच्या क्षेत्रानुसार पहाणी करून अंतिम अहवाल सादर करणार आहे. अतिवृष्टीने खरिपातील सोयाबिन; मका, बाजरी, कापूस, ऊस,भाजीपाला, कांदा, भुईमूग, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, भात, फळपिके व चारापिके ेंयांचे नुकसान झाले आहे.
पीक कापणी प्रयोगातून ठरते विम्याची रक्कम
पीक कापणी प्रयोग राबविला जातो त्यात एकाच पिकाच्या चार एकरातील छोटासा प्लॉट निवडून पिककापणीचे 12 प्रयोग केले जातात त्यातून पिकांच्या आणेवारी प्रमाणे सरासरी काढून उत्पन्न काढले जाते. त्यानुसार संबंधित लाभार्थ्याला विम्याची रक्कम म्हणून दिली जाते.