गुवाहाटी : आसामच्या बहुतांशी भागात आज शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. त्यामुळे राज्यातील स्थिती शांत होती. परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे दिब्रुगढमधील संचारबंदी 16 तासांसाठी शनिवारी सकाळी उठवण्यात आली.
सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ ऑल आसाम स्टुडंटस् असोसिएशन राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. आसाममधील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बुधवारी सुरू करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी निदर्शने करताना आणि माहिती सोशल मिडियावर व्हायरल करताना काळजी घ्यावी, असे आवहन आसाम पोलिसांनी केले आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या कायद्याची भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या भूमीपुत्रांवर कोणताही अन्या होणार नाही,अश ग्विाही दिली आहे.