प्रकाश राज यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत ट्वीटद्वारे प्रश्न विचारला आहे. प्रकाश राज यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
या ट्विटमध्ये प्रकाश राज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रिय पंतप्रधान, राष्ट्रीय नोंदणीकृत बेरोजगार, संकटातले शेतकरी, शिक्षणाशिवाय मुले, बेघर गरीब. ही आपली प्राथमिकता असू नये काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभर निषेध तीव्र होत आहे. जनतेबरोबरच सेलिब्रिटी नागरिकत्व कायद्यास आपला विरोध नोंदवित आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरही निदर्शने करण्यात आली होती, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला होता.