नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणाला सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेते उमा भारती यांनी शरद पवार यांच्या विधानावर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते, काही लोकांना वाटते की राम मंदिर बांधल्यामुळे कोरोना संपेल. ते सोलापूर येथे कोरोना संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. यावर उमा भारती म्हणाल्या, पवारांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात नसून भगवान राम यांच्याविरोधात आहे.
येत्या ५ ऑगस्ट’ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. ट्रस्ट ने त्यांना ऑगस्ट महिन्यातील ३ आणि ५ अश्या दोन तारखा दिल्या होत्या. त्यापैकी ५ तारीख पंतप्रधान कार्यालयाने ठरवली असल्याची माहिती आहे.
This statement is against Lord Ram, not against PM Modi: BJP leader Uma Bharti on NCP leader Sharad Pawar’s remark, ‘We are thinking of how to fight #Coronavirus while some people think that corona will go by building a temple’ pic.twitter.com/zUGR1rkI6t
— ANI (@ANI) July 20, 2020
शरद पवार म्हणाले होते, “करोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून करोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”