बंगळुरू : येथील ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या कर्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईवर या संस्थेने सरकारवर छळाचा आणखी एक प्रयत्न केला असल्यची टीका केली आहे. मानवी हक्काचा लढण्याची किंमत मोजली असल्याचे त्यांनी सांगितले.
परकीय सहभाग नियामक कायद्याच्या उल्लंघन केल्या प्रकरणात ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अंमलबजावणी संचनालयाने या संस्थेला 51 कोटी रुपयांचा परकीय चलन नियामक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस पाठवली होती. त्यापाठोपाठ ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतातील मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकरणात संस्थेने ठाम भूमिका घेतली आहे. रोखठकपणे ती मांडली आहे. त्यामुळे सस्थेचा छळ करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षात होत आहे. त्याचाच हा नवा प्रकार आहे. आम्ही भारत आणि परकीय कायद्यांना बांधील आहोत. मानवी हक्कासाठी लढा देणे हेच आमचे भारत आणि सर्वत्र काम आहे. याच तत्वांनी भारतीय घटना समृध्द केली आहे. शांतता, सहिष्णूता आणि अनेकतेतून एकतेची भारताची परंपरा आहे, असे संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे.