पुणे – महाराष्ट्राचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे यांचे निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विठोबा भरणे हे गेल्या काही महिन्यापासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री ११च्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
दत्तात्रय भरणे यांनी भावनिक ट्विट शेअर केले आहे. लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) December 29, 2020
ते तात्या नावाने परिचित होते. प्रगतशील शेतकरी अशी त्यांची ख्याती होती. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांच्या पाठीमागे पत्नी, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह चार मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. बुधवार (ता. 30) सकाळी 11-00 वाजता इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.