नवी दिल्ली – एआयएमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य होते, आम्ही 15 कोटी आहोत, परंतु 100 कोटींना भारी आहोत, असे बेताल वक्तव्य त्यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे जाहीर सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विवादित विधानमुळे सध्या देशभरातून राजकीय पक्षातील नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे. याच संदर्भात महाराष्ट्रतील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.
महाराष्ट्र के पूर्व CM देवेंद्र फडणवीस: मुस्लिम देशों में अल्पसंख्यक इस तरह की बदज़ुबानी नहीं कर सकते। हिंदू समाज सहिष्णु है सबको साथ लेकर चलता है लेकिन हिंदू समाज की सहिष्णुता को उसकी कमजोरी न माने। उन्हें हिंदुओं और पूरे समाज से माफी मांगनी चाहिए। https://t.co/ppZOy0YdKt
— ANI_HindiNews (@AHindinews) February 21, 2020
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’ वारीस पठान यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. मी वक्त्यव्याचा निषेध करतो, त्यांना हे ध्यानात ठेवायला हवे की, १०० करोड पेक्षाही जास्त हिंदू देशात राहतात त्यामुळे देश सुरक्षित आणि स्वतंत्र आहे. मुस्लिम देशात अल्पसंख्याक या प्रकारचे वक्तव्य करू शकत नाही. हिंदू समाज सहिष्णू असून सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. मात्र हिंदू समाजाच्या सहिष्णुतेला तुम्ही कमी समजू नका, पठाण यांनी संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, जाहीर सभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्यास ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांनी नकार दिला आहे. मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेलं नाही. अशी प्रतिक्रिया पठाण यांनी दिली आहे.