मुंबई : नोबेल विजेते, नामांकित राजकारणी, उद्योगपती, कवी देणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाविरोधात एका विद्यार्थी संघटनेने कट रचला आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केला.
राऊत यांनी कोणत्याही संघटनेच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर होता. ते म्हणाले, गेली पाच वर्षे या विद्यापीठावर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. या अस्वस्थ करणाऱ्या घटना घडत असताना सरकार मात्र सुधारित नागरीत्व कायद्या सारख्या गोष्टीत मशगुल आहे.
देशातील विद्यार्थी जर सुरक्षित नसतील, देश सुरक्षित राहू शकणार नाही. देशातील विद्यापीठात रात्री पोलिस घुसतात आणि गोळीबार करतात हे काही चांगले लक्षण नाही. त्याच पोलिसांसमोर तोंड झाकलेले गुंड शिरतात आणि तरूणांना रक्तबंबाळ हपईपयइंत मारहाण कतरतात, हे योग्य नाही, असे ते म्हणाले.