मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं होतं. अनेकांनी याबाबत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचंही आरोप केला होता. मात्र आज सुशांतची हत्या नसून आत्महत्या आहे, असं एम्सने सीबीआयकडे सादर केलेल्या अहवालामध्ये स्पष्ट केलं आहे.
यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. पवार यांनी ट्विटद्वारे, ‘ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्यांनी सर्वांनी तोंड न लपवता माफी मागावी,’ अशी मागणी देखील केली आहे.
मात्र आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी वापरलेल्या एका हॅशटॅगमुळे त्यांचा निशाणा पार्थ पवार यांच्याकडे होता की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यानंतर शरद पवार यांनी त्यांना चांगलेच फटकारले, मात्र तरीही त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्यानंतर सत्यमेव जयते असे ट्विटही करत पक्षविरोधी भूमिका घेतली होती.
अशातच आज रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करताना पार्थ पवार यांनी वापरलेला सत्यमेव जयते हा हॅशटॅग वापरल्याने त्यांचे हे ट्विट पार्थ पवार यांना उद्देदेशून होते की काय? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.
बिहार निवडणुकीसाठी #SushantSinghRajput च्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर #AIIMS च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी.#सत्यमेवजयते
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 3, 2020
काय म्हणाले रोहित पवार?
“बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या मृत्यूचं भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर AIIMS हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने दिलेल्या अहवालामुळे पाणी फेरले आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी. #सत्यमेवजयते”
पार्थ पवारांचे ते ट्विट
सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020