जळोची – जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीने बारामती शहरात मंगळवारी (दि. 2) मुक्काम केल्यानंतर सोहळ्याने बुधवारी (दि. 3) काटेवाडीच्या दिशेने प्रस्थान केले.
काटेवाडीत विसाव्यासाठी थांबलेल्या पालखीचे पार्थ पवार यांनी स्वागत करुन दर्शन घेतले. वर्षानुवर्षे पवार कुंटुंबीय काटेवाडीत विसाव्याच्या ठिकाणी पालखीचे स्वागत करुन दर्शन घेतात. यंदा प्रथमच पार्थ पवार यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. महाराष्ट्र भर पाऊस पडावा. जेणे करुन सर्वजण सुखी व आंनदीत राहावेत, अशी प्रार्थना त्यांनी तुकोबांच्या चरणी केली. यावेळी शर्मिला पवार उपस्थित होत्या.