मुंबई : राज्यात कोरोना कोरोना विषाणूचे संकट पाहता नागरिकांनी उद्या होणाऱ्या हनुमान जयंती आणि शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये असे अवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. नागरिकांनी पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी असं त्यांनी म्हंटल आहे.
तसेच राज्यात कोरोनाबाधितांची होणारी वाढ पाहता काही भाग सीलबंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बंदी आदेश जरी करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. कोरोनासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही असं उपमुख्यमंत्री म्हणाले.