अणे – गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे परतीच्या पावसाने पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेण या पावसामुळे बागेतील पपईची पाने गळून गेलू असून, फळांचेही नुकसान झाले आहे. याबरोबरच केळीच्या बागांचेही नुकसान झाले आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील तांबेवाडी, निमगाव सावा, साकोरी, बेल्हे, बांगरवाडी, जाधववाडी या भागांत फळबागांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील साचलेले पाणी अजूनही कमी झालेले नाही. तर सतत पडणाऱ्या पावसामुळे रोपे पिवळी पडली असून, फळेही गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या परिसरातील फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित होऊन भरपाई कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच पुढील हंगामाचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पपईची फळे गेली वाया असूृन, साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. अद्याप शेतातल पाणीही कमी झालेले नाही. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुढील दोन वर्षे शेतात राबावे लागेल. सरकारने नुकसानीप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करावी.
– सुभाष बांगर, शेतकरी, गुंजाळवाडी