मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे.
पंकजा मुंडे यांनी म्हंटले कि, ‘सागरा प्राण तळमळला’ या देशात तरुणांना काय हवंय.. 1947 पूर्वी स्वातंत्र्य हवं होतं, आता स्थैर्य हवं आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने होतोच..प्रचंड संताप ही होतो..सर्वांना होतो.. त्यांच्या नावाच्या राजकारणाने पीडा ही होते. कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार ???..जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले, असे ट्विट त्यांनी केले आहे.
कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार ???..जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले .. #Savarkar
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 16, 2019
दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफीची मागणी भाजपने केली. पहिल्याच दिवशी भाजपचा हा पवित्रा पाहता हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.