मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहूमत मिळाले. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी बिहारचे निवडणुक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचं विजयात महत्वाचं योगदान असल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं.
याखेरीज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील फडणवीसांचं कौतुक केलं. ‘नक्कीच त्यांनी सुत्र हलवली असतील, त्यांचे अभिनंदन’, असं संजय राऊत म्हणाले. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बिहार निवडणुकीतील विजयाच्या यशाचं श्रेय फडणवीसांना देणं टाळलं आहे.
“बिहार विधानसभा आणि विविध प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये देशातील जनतेनं पुन्हा एकदा सुशासन, विकास आणि प्रगतीच्या राजकारणाचा स्विकार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सबका साथ, सबका विकास या रणनितीचा हा विजय आहे”, असे पंकजा मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे.
मैं गृहमंत्री मा. @AmitShah जी, और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मा. @JPNadda जी के साथ हीं @BJP4India के सभी कार्यकर्ताओं को हृदय से बधाई देती हूं !!
(2/2)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 11, 2020
तसेच मुंडे यांनी ट्विट करून बिहार विधानसभा आणि मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या विजयाबद्दल भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.
राज्यातील अनेक भाजपा नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी बिहार निवडणुकीतील विजयाचं श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं असताना पंकजा मुंडे यांनी केलेल्या अभिनंदनाच्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजूनही नाराज आहेत की काय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.