भारतीय उच्चायुक्तांनाही परत पाठवणार
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आता भारताचा शेजारील देश पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. याचीच प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवले आहे. एवढेच नाही तर त्यांचे भारतातील उच्चायुक्त मोईन उल हक्क यांना माघारी बोलावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भारताबरोबरचे सर्वच व्यापारी संबंधही तोडण्याचा तसेच राजनैतिक संबंध निम्नस्तरावर आणण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
Pakistan National Security Committee decided to take following actions
1. Downgrading of diplomatic relations with India.
2. Suspension of bilateral trade with India.
3. Review of bilateral arrangements. 2/2 https://t.co/PBj5OA16Rc— ANI (@ANI) August 7, 2019
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बैठकांवर बैठका घेत आहेत. इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये भारतासंबंधीचे निर्णय घेण्यात आले. तसेच काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रात धाव घेण्याचे पाकिस्तानने ठरवले आहे. ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णयही पाकने जाहीर केला आहे. बिथरलेल्या पाकिस्तानने आपल्या पार्लमेंटचे तातडीचे संयुक्त अधिवेशन मंगळवारी बोलावले आणि 370 कलमाचा निर्णय घेतल्याने पुलवामासारखे आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याची दर्पोक्ती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. भारताने 370 कलम रद्द केल्याने आणि लडाख हे वेगळे केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केल्यामुळे नाराजी व्यक्त करणाऱ्या चीनने कैलास मानसरोवरला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना व्हिसा नाकारला आहे.