नवी दिल्ली : भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. सध्या देशातील करोना बाधित रुग्णांची संख्या एक कोटी ६२ लाख ६३ हजारांवर पोहचली आहे. भारतामधील करोना परिस्थिती इतकी गंभीर आहे की अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.
अशा परिस्थितीत भारतातील गंभीर परिस्थिती पाहून पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानमधील सेवाभावी संस्था असणाऱ्या एधी फाउंडेशनने भारताला ५० रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या एधीने घेतलेल्या या पुढाकारासाठी संस्थेचे कौतुक केले जात आहे. एधी फाउंडेशनलाचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. “आम्ही भारतातील करोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.
करोना आणि त्याचा भारतींयांवर होणारा परिणाम याकडे आमचे सातत्याने लक्ष आहे. या करोना महामारीचा तुमच्या देशावर झालेल्या गंभीर परिणासंदर्भात आम्हाला चिंता आहे. भारतामध्ये सध्या अनेकांना करोनासंदर्भातील संकटाला तोंड द्यावं लागत आहे. सध्याच्या या संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये ५० रुग्णावाहिका पाठवू इच्छितो. रुग्णावाहिकांसोबतच त्यासंदर्भातील सेवा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो,” असे या पत्रामध्ये म्हटले आहे.
रशियाची लस घेण्यासाठी भारतीयांना मोजावे लागणार…
“मी फैजल एधी, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. सध्याची परिस्थिती गंभीर आहे याची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. यामध्ये तुमच्या नियोजनात आमची काही अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळेच आमच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णावाहिकांसोबत आम्ही स्वयंसेवकांची टीमही पाठवू,” असेही या पत्रात म्हटले आहे.
Heartwarming to see top trend from Pakistan #PakistanstandswithIndia #भारत_का_वीर_पुत्र_मोदी provided the country with vaccine nice to see them appreciate his kindness and reciprocate with love, we too acknowledge their empathy in these testing times #भारत_का_वीर_पुत्र_मोदी
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 24, 2021
विशेष म्हणजे पाकिस्तानमधून पाठवण्यात येणारी ही टीम स्वत: सोबत सर्व सामान घेऊन येणार असून भारताकडून केवळ परवानगी हवी असल्याचं म्हटलं आहे. “आम्हाला ही योजना राबवताना भारताकडून काहीच नकोय. आम्ही आमचे इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू. आमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी, इतर अधिकारी, चालक आणि सपोर्टींग स्टाफ असतील,” असे पत्रात नमूद केले आहे.
देशात 11 ते 15 मे दरम्यान होणार करोनाचा उद्रेक; महाराष्ट्रात मात्र…
“तुम्ही आम्हाला केवळ भारतात येण्याची परवानगी द्या आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य मिळेल यासंदर्भातील सूचना करा. तुम्ही सांगाल त्या प्रदेशांमध्ये आम्ही आमच्या टीम पाठवण्यास तयार आहोत. तुमच्या सांगण्यानुसाच आम्ही काम करु, आम्हाला केवळ परवानगी द्या.
सध्याच्या संकटाच्या प्रसंगामध्ये मदत करण्याची आमची इच्छा आहे. आम्हाला शक्य असेल त्या माध्यामातून आम्ही तुम्हाला मदत करु इच्छितो. आमच्या मदतीमुळे भारतीय नागरिकांना दिला मिळणार असेल तर तुम्ही म्हणाल ती मदत करायला आम्ही तयार आहोत,” असेही एधी यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.