नवी दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात जागतिक बँकेकडून दोन वेळा कर्ज घेणाऱ्या पाकिस्तानने भारताला आर्थिक मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यांनी ट्विट करत भारतातील परिस्थिती बिकट असल्याचा दावा केला होता. भारताकडून इम्रान खान यांना चोख उत्तर देण्यात आले असून करोनाशी लढण्यासाठी भारताने जितके पॅकेज जाहीर केले आहे, तितका तर पाकिस्तानचा जीडीपीदेखील नाही अशी आठवण करुन दिली आहे. गुरुवारी भारतातील ३४ टक्के कुटुबांकडे अन्नासाठी पैसे नाहीत असा दावा करत मदत करण्यास आपण तयार असल्याची ऑफर दिली होती. त्यालाच भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
इम्रान खान यांनी आपण भारताची मदत करण्यासाठी पाकिस्तानचा कॅश ट्रान्सफर प्रोग्राम शेअर करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. इम्रान खान यांनी भारतात करोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांना हलाखाची परिस्थिती सहन करावी लागत असल्याचा दावा करणारे ट्विट केले होते. इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तान आपल्या लोकांना पैसे देण्याऐवजी देशाबाहेरील बँक खात्यांमध्येच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ओळखले जाते. इम्रान खान यांना नवे सल्लागार आणि चांगली माहिती मिळण्याची खूप गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे चोख उत्तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिले आहे.
Acc to this report, 34% of households across India will not be able to survive for more than a week without add assistance. I am ready to offer help & share our successful cash transfer prog, lauded internationally for its reach & transparency, with India.https://t.co/CcvUf6wERM
— Imran Khan (@ImranKhanPTI) June 11, 2020
अनुराग श्रीवास्तव यांनी ऑनलाइन मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आपल्या सर्वांना पाकिस्तानवर असणाऱ्या कर्जाची माहिती आहे. कर्जामध्ये ते पूर्णपणे बुडाले आहेत. पाकिस्तानचा जितका वर्षाचा जीडीपी नाही त्याहून जास्त भारताने पॅकेज जाहीर केले आहे, असे प्रत्युत्तर अनुराग श्रीवास्तव यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी लढण्यासाठी तसंच वेगवेगळ्या क्षेत्रांना उभारी देण्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.