फजितीनंतर केले ट्विट डिलीट
नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्यापासून ते आजपर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला विरोध करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. असाच एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी सोशलमीडियाच्या माध्यमातून केला मात्र त्यांचा हा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला. कारण त्यांनी भारताबद्दल एक चुकीचे आणि खोटे ट्विट केले होते. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केल्यानंतर त्यांनी ते ट्विट केल्याचेही पहायला मिळाले. परंतु तोपर्यंत त्या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये पोलीस कथितरित्या हिंसाचार करत असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनीही यावर ट्विट करत ते व्हिडीओ भारतातील नसल्याचे म्हटले आहे.
Tweet Fake News.Get Caught.
Delete Tweet. Repeat#Oldhabitsdiehard pic.twitter.com/MjFtzP0WHW— Raveesh Kumar (@MEAIndia) January 3, 2020
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधादरम्यान भारतात पोलिसांचा हिंसाचार असे म्हणत त्यांनी तीन व्हिडीओ पोस्ट केले होते. भारतातील पोलीस मुस्लिमांवर हल्ला करत असल्याचेही त्यांनी यात म्हटले होते. परंतु त्यांनी पोस्ट केलेले व्हिडीओ हे खोटे असल्याचे तेव्हा समोर आले जेव्हा ते भारतातील नसून बांगलादेशील असल्याची माहिती मिळाली. तसेच ते व्हिडीओ 2013 मधील असून बांगलादेशातील रॅपिड ऍक्शन बटालियन काही तरूणांना मारत असतानाचे होते.
उत्तर प्रदेश पोलिसांनीही ट्विट करत ते व्हिडीओ भारतातील नसल्याचे सांगितले. तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनीदेखील यावर कठोर शब्दात निशाणा साधला. खोट्या बातम्या ट्विट करा. पकडले जा. ट्विट डिलिट करा आणि पुन्हा तेच काम करा अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनीदेखील पाकिस्तानकडून असे प्रकार वारंवार होत असल्याचे म्हटले आहे.