टी-२० विश्वचषकाच्या फायनल सामन्यात इंग्लंडने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. पाकिस्तानला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने बेन स्टोक्सच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर १९ षटकांत ५ गडी गमावून १३८ धावा करत सामना जिंकला. या सामन्यावेळी मैदानात अनेक भारतीय चाहते पाहायला मिळाले. मैदानात इंग्लंड आणि पाकिस्तानच्या झेंड्यांमध्ये भारताचा ध्वजही फडकताना दिसत होता.
#ENGvsPAK | “पाकिस्तान हार गया…”सामना हरल्याने चाहत्याला भावना अनावर
भारतीय क्रिकेट चाहत्यांनी भारतीय संघ फायनलमध्ये जाईल या इराद्याने अगोदरच तिकीट बुक केले होते. मात्र संघ फायनलमध्ये न पोहचू शकल्याने अनेक भारतीय चाहते इंग्लंड आणि पाकिस्तनचा सामना पाहण्यासाठी मेलबर्नच्या मैदानावर पोहोचले होते. त्यामुळे ते सामना सुरु असताना जशी सामन्याची दिशा बदलेल तसे ते जल्लोष करताना दिसले. मात्र संघाच्या पराभवाचा राग पाकिस्तानी चाहते भारतावर काढताना दिसत आहेत. पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारी हिने भारताबाबत एक वादग्रस्त ट्विट केले आहे.
A Ben Stokes special at the MCG! 😍
England take a special title home 🏆#PAKvENG | #T20WorldCupFinal | 📝 https://t.co/HdpneOrKoo pic.twitter.com/BOIrCSwlyn
— ICC (@ICC) November 13, 2022
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडच्या सॅम करनने भेदक मारा करत ३ फलंदाजांना तंबूत पाठवले होते. पाकिस्तान संघाला १३७ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनी हुशारीने खेळ केला आणि संघाला विजय मिळवून दिला. बेन स्टोक्सने ४९ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही एक गडी बाद केला होता.
#T20WorldCupFinal
Currently every Indian ✨😅…#PKMKBForever #PAKvENG pic.twitter.com/rAS3CqwEIg— Aman Sah (@sahaman01) November 13, 2022
संघाचा पराभव पाकिस्तानच्या काही लोकांना चांगलाच तिखट लागला आहे. पराभव न पचल्याने पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने भारताबाबत वादग्रस्त ट्विट केले आहे. ‘भारतीय अजून इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेले नाहीत.’ अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.
Celebration in India actually reveals they never came out of British slavery. They are celebrating the same way like they did in 1857 after joining hands with Britons. Deceiving is in their nature 😊
— Sehar Shinwari (@SeharShinwari) November 13, 2022