इस्लामाबाद – सागरी हद्दीमध्ये घुसखोरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या 20 भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानकडून सुटका करण्यात येणार आहे. या मच्छिमारांना वाघा सीमेवरून बीएसएफच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असे तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कराचीतील लोधी कारागृहात बंदिस्त असलेल्या मच्छिमारांची रविवारीच मानवतावादी भूमिकेतून सुटका करण्यात आली आहे. आता 20 मच्छिमारांची सुटका केल्यावर पाकिस्तानमधील तुरुंगात भारताचे 568 कैदी शिल्लक राहिलेले असतील, असे पोलीस उपाधिक्षक अझीम थोबो यांनी सांगितले.
सोडून देण्यात येणाऱ्या या सर्व मच्छिमारांना पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये घुसखोरी केल्याबद्दल आणि अवैधरित्या मासेमारी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. सुटकेसाठी त्यांना इधी फौंडेशन या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून लाहोरला आणण्यात आणले गेले आहे.
दरवर्षीप्रमाणे कैद्यांच्या यादीची आदलाबदल केल्यावर भारताचे 628 कैदी पाकिस्तानातील तुरुंगात असल्याचे उघड झाले आहे. तर भारतातील तुरुंगांमध्ये पाकिस्तानातील 355 कैदी आहेत.