शारजा – आशिया चषक 2022 मधील सुपर फोर फेरीत काहीच भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूनं लागला आहे. (Pakistan won the toss and elected to field) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
ASIA CUP 2022. Pakistan won the toss and elected to field. https://t.co/Yn2xZGBNtL #INDvPAK #AsiaCup202
— BCCI (@BCCI) September 4, 2022
दरम्यान, साखळी फेरीत पाकिस्तानचा पराभव केल्याने भारतीय संघाचे मनोबल वाढलेले असून ही विजयी मालिका कायम राखण्यासाठी रोहित सेना मैदानात उतरणार आहे.
हे दोन्ही संघ आठ दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. शेवटच्या सामन्यात भारताने पाच गडी राखून विजय मिळवला. आता हा सामना जिंकून फायनलचा मार्ग सुकर करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील.