इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये घुसलेल्या भारताच्या एका पाणबुडीला अडवल्याचा दावा पाकिस्तानच्या नौदलाने केला आहे. पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी हा दावा केला आहे. 16 ऑक्टोबरला पाकिस्तानी नौदलाने ही पाणबुडी रोखली असे पाकिस्तानी लष्कराच्या प्रसिद्धी विभागाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पाणबुडीने सातत्याने भारताच्या पाणबुडीवर लक्ष ठेवले होते. तसेच या पाणबुडीला रोखण्यासाठी पूर्ण व्यवसायिक निकषांचे पालन केले गेले, असे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना “आयएसआय’ने म्हटले आहे.
भारीतय पाणबुड्यांना रोखल्याचा दावा पाकिस्तानच्या नौदलाकडून तिसऱ्यांदा करण्यात आला आहे. यापूर्वी भारतीय नौदलाकडून 2016 च्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा करण्यात आला होता.
त्यानंतर मार्च 2019 मध्ये पाकिस्तानच्या नौदलाने पुन्हा एकदा भारतीय पाणबुडीला हुसकावून लावल्याचा दावा केला होता. पाकिस्तानी नौदलाने केलेल्या या दाव्याची सत्यता पडताळून पाहता येऊ शकलेली नाही.