मॅंचेस्टर : भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढत एखाद्या धर्मयुध्दासारखीच खेळली जाते. अंतिम सामन्यापेक्षाही या लढतीबाबत कमानीची उत्कंठा असते. आज येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामनाही त्यास अपवाद नाही. विश्वचषकाच्या इतिहासामध्ये भारताने पाकिस्तानसोबत आजतागायत एकही सामना गमावला नाही. तरीदेखील आम्ही सामना जिंकणारच असा विश्वास माध्यमाशी बोलताना पाकिस्तान कर्णधार सर्फराझ अहमद याने व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना सर्फराझ म्हणाला की, भारतावर आम्ही यापूर्वी अनेक वेळा विजय मिळविला आहे. येथेही त्याचीच पुनराबृत्ती घडणार आहे याबाबत मला तीळमात्र शंका नाही.
ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला आम्ही शेवटपर्यंत झुंजविले होते. आमचे खेळाडू भारताला सामोरे जाण्यासाठी उत्सुक झाले आहेत असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने सांगितले.