नवी दिल्ली – पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर ऍक्सेस देणार असल्याचे म्हटले होते. परंतु यासाठी त्यांनी भारतासमोर तीन अटी ठेवल्या होत्या. दरम्यान, भारताने त्यांच्या अटी मान्य करण्यास नकार दिला आहे.
पाकने ठेवलेल्या या अटींमध्ये पहिली अट ही होती की, ज्या ठिकाणी कुलभूषण जाधवची आणि भारतीय अधिकाऱ्यांची भेट होईल त्या ठिकाणी पाकिस्तानचा एक अधिकारी उपस्थित राहिल. त्याच बरोबर दुसऱ्या अटीत ते म्हणाले की, ज्या ठिकाणी ही भेट होईल, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. तसेच तिसरी अट म्हणजे भारतीय अधिकारी आणि कुलभूषण जाधव यांच्यात होणारी चर्चा रेकॉर्ड केली जाईल. तर, भारताकडून केवळ एकाच अधिकाऱ्याला कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्यात येईल.
दरम्यान, भारतीय अधिकारी आणि कुलभूषण जाधव यांच्या होणारी चर्चा पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारीदेखील ऐकतील असे पाकिस्तानकडून घालण्यात आलेल्या अटीनंतर स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या या सर्व अटी फेटाळून लावल्या आहेत.