वक्तव्य पुर्ण निराधार असल्याचा पाकचा दावा
इस्लामाबाद : पाकिस्तानातील बालोकोट येथील दहशतवाद्यांचा तळ पुन्हा कार्यरत झाल्याचा जो दावा भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी केला आहे त्यावर पाकिस्तानने जोरदार आक्षेप नोंदवला असून त्यांचा हा दावा पुर्ण निराधार आहे असे त्यांनी म्हटले आहे. बालाकोट येथे जेैश ए महंमदचा अड्डा होता. तो भारतीय हवाईदलाने बॉंम्बहल्ला करून उद्धवस्त केला होता.
त्या अनुषंगाने पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने आज एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कीे, जम्मू काश्मीरातील मानवाधिकारच्या उल्लंघनाच्या बाबीवरील लक्ष विचलीत करण्यासाठीच भारताकडून हा दावा केला गेला आहे. अशी दिशाभुल करणारी विधाने करून जागतिक समुदायाचे लक्ष विचलीत करण्यात भारत यशस्वी होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.