राडारोडा हटवला : काही तासांतच वाहतूक पूर्वतवत
ओतूर – नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटा जवळील वेळखिंडीत गुरुवारी (दि. 6) दरड कोसळली. सुदैवाची बाब म्हणजे यावेळी वाहतूक किंवा कोणाची ये-जा करीत नसल्याने जीवित व वित्त हनी झालेली नाही.
माळशेज घाट परिसरात सध्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यातच खुबी करंजाळे ते पारगाव फाट्या दरम्यान असलेल्या वेळखिंडीत गुरुवारी सकाळी दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर माती व राडारोडा महामार्गावर आल्यामुळे कल्याण-नगर हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. रस्त्यावरील राडारोडा लागलीच हटवण्यात आल्याने काही तासातच वाहतूक पुर्ववत करण्यात आली.
दरवर्षी पावसाळ्यात या भागात दरडी कोसळत असतात. पावसाचे अधिकचे प्रमाण वाढल्यास दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असल्याने प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.