यावेळी कैलास मोते म्हणाले की, देशातील कृषी क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे .कृषी विभागाची कामगिरी आदर्श असल्याने येत्या काही दिवसात राज्याच्या कृषी विभागासाठी पाच मिलियन डॉलरची गुंतवणूक होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्यात कृषी विभागाची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. विविध कृषी योजना राबविण्यासाठी राज्य देशात अग्रभागी आहे म्हणूनच देश-विदेशातील गुंतवणूकदार पुढे येत आहेत. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले शरीर चांगले ठेवण्या बरोबर चांगले खेळ करून, कसरती केल्या तर मनामध्ये चांगला विचार येतो त्यामुळे स्फूर्ती मिळून आपल्या हातून कृषी विभागाचे आधिक चांगले काम होईल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक क्रिडा संकुलात २१ फेब्रुवारी ते २३फेब्रुवारी या दरम्यान चौथी वार्षिक कृषी राज्यस्तरीय ‘तरंग’ कला व क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे याचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते करण्यात आले या क्रीडा स्पर्धेसाठी कृषि विभागाचे राज्याच्या ३४जिल्ह्यासह आयुक्त कार्यालयातील १हजार ८०० खेळाडू कर्मचारी व २०० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा सह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान सहभागी खेळाडूंना निवास, भोजनाची व्यवस्था लागणारे खेळांचे साहित्य, योग्य प्रशिक्षक पंच व इतर व्यवस्था आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाने केली आहे.
तीनदिवसीय कला व क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या सर्व विभागाचे प्राचार्य, विभाग प्रमुख,क्रिडा विभाचे सर्व प्रशिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर कोपरगाव तालुका कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनीही मोलाचे सहकार्य केले आहे.
दरम्यान हॉलीबॉलचा पहीला सामना मान्यवरांच्या हस्ते सोलापूर विरूध्द अकोला असा लावण्यात आला .
महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी विविध जिल्ह्यातील कृषि विभागाच्या खेळाडूंनी मान्यवरांना व ध्वजाला मानवंदना देताना, उस्मानाबादचा पोतराजी गोंधळ, लातूरचा चित्ररथ, ठाण्याचा रेनहार्वेस्टींग कलापथक, पुण्याची संस्कृती, नगरच्या कलारथाने सर्वांचे लक्ष वेधले होते तर इतर जिल्ह्याच्या खेळाडूंनी आकर्षक मानवंदना देवून क्रिडा महोत्सवात रंगत लाढवली.