चिंबळी-गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी परिसरातील विविध भागामध्ये खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. महसूल विभागाच्या वतीने पीक पाहणी करून पंचनामा करण्याचे काम सुरू असताना बुधवारी (दि. 6) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वीजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाने झोडपले. यामध्ये चार महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.