पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या गावांमध्ये आजही शेती केली जाते. पावसामुळे संकटात सापडलेल्या भातपिकाला मोठा फटका बसला आहे. परंतु पावसातून बचावलेल्या पिकाची काढणीला वेगात सुरू आहे. पुनावळे परिसरात यंत्राद्वारे भातकापणी केली जात आहे.
भात काढणीसाठी मजूर टंचाई असल्यामुळे बहुतांश शेतकरी यंत्राद्वारे भातकाढणी करीत आहेत. गतवर्षी ही ऐन भात कापणीच्यावेळी अवकाळी पावसामुळे भातपीक धोक्यात आले होते. गतवर्षी प्रमाणे यंदाही सोन्यासारखे आलेले भातपीक अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात वाया जाऊन शेतकऱ्यांच्या भातपिकासह मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सध्या लहरी हवामानाने विश्रांती घेतल्याने उर्वरित तयार झालेल्या पिकावरील धोका संपला आहे. वातावरणातील सततच्या बदलमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या भागात इंद्रायणी व कोळंबा भाताचे पीक अधिक घेतले गेले. यंदा कोळबा पिकाला फटका बसला आहे.