नवी दिल्ली : काँग्रेसचे मुखपत्र ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीने तब्बल दहा तास चौकशी केली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये पी.चिदंबरम यांचाही समावेश होता. मात्र यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत पी चिदंबरम यांच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे हाड मोडले आहे.
पोलिसांनी धक्का दिल्यानंतर पी चिदंबरम जखमी झाले असून हाड मोडले असल्याचा दावा रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. “मोदी सरकारने सर्व हद्द पार केल्या आहेत. माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यांचा चष्मा जमिनीवर फेकला गेला. त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून डाव्या बाजूचं हाड मोडलं आहे. खासदार प्रमोद तिवारी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्या डोक्याला जखम असून त्यांचंही हाड मोडलं आहे. ही लोकशाही आहे का?,” अशी विचारणा रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे.
Former Union Minister and senior leader P Chidambaram suffered a fracture in his left rib after he was pushed away by Police today during the party’s protest in Delhi: Congress party
(File photo) pic.twitter.com/Ls2bR5JcOj
— ANI (@ANI) June 13, 2022
पी चिदंबरम यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून जखमी झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. “जेव्हा तीन पोलीस कर्मचारी तुमच्या अंगावर धावून येतात तेव्हा फक्त हेअरलाइन फ्रॅक्चर होत असेल तर सुदैव आहे. डॉक्टरांनी जर हेअरलाइन क्रॅक असेल तर १० दिवसात तो बरा होईल असं सांगितलं आहे. मी ठीक आहे आणि उद्यापासून कामावर जाणार आहे,” अशी माहिती पी चिदंबरम यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.
When three big, burly policemen crash into you, you are lucky to get away with a suspected hairline crack!
Doctors have said that if there is a hairline crack, it will heal by itself in about 10 days
I am fine and I will go about my work tomorrow
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) June 13, 2022
‘नॅशनल हेराल्ड’ची मूळ कंपनी ‘असोसिएट जर्नल’ आणि ‘यंग इंडियन’ कंपनीतील आर्थिक व्यवहारासंदर्भात ‘ईडी’च्या चार अधिकाऱ्यांच्या चमूने राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. राहुल गांधी यांची ही चौकशी दोन टप्प्यांमध्ये झाली. सकाळच्या सत्रात साडेअकराच्या सुमारास ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी राहुल यांचा जबाब नोंदवण्यास सुरूवात केली. तीन तास चौकशी झाल्यानंतर भोजनासाठी मध्यंतर झाले आणि त्यानंतर दुपारच्या सत्रातही राहुल गांधी यांचे जबाव नोंदवले गेले. बहुतांश प्रश्नांना राहुल गांधी यांनी हो-नाही एवढीच उत्तरे दिली. अनेक प्रश्नांसंदर्भात माहिती नसल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे कळते.