नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपले अस्तित्व पणाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशातील सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आखणी करत आहे तर दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी इतर पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. त्यातच एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगींना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता त्यांनी या विधानावरून माघार घेतली आहे.
या विधानावर यु टर्न घेते ते म्हणाले,’योगी आदित्यनाथ यांना वैयक्तिकरित्या आव्हान देण्याचे विधान नाही, परंतु राजकीय विरोधातील आहे, जर आम्ही विरोधात आहे, तर आम्ही सरकार स्थापन करू देणार नाही.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘आम्ही युतीसंदर्भात भागीदारी आघाडीत आहोत आणि ओमप्रकाश राजभर सर्व पक्षांना आपल्यासोबत सामील करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम शंभर जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रियाही एमआयएमने सुरू केली आहे. याबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करून माहिती दिली होती.
“उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीबद्दल काही मुद्दे मांडत आहे. शंभर जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने उमेदवार निवड प्रक्रिया सुरू केली आहे. आमची आघाडीसंदर्भात कोणत्याही पक्षांशी चर्चा झालेली नाही,’ असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले होते.