नवी दिल्ली – हैदराबाद पालिका निवडणुकीमध्ये वर वर दोन पक्षांमधील लढाई दिसत असली तरी एआयएमआयएम, भाजपाबरोबरच टीएमसीही या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि एआयएमआयएममध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
If there’re 30,000 Rohingyas in electoral list, what is Home Minister Amit Shah doing? Is he sleeping? Isn’t this his job to see how are 30-40 thousand Rohingyas listed? If BJP is honest, it should show 1,000 such names by tomorrow evening: Asaduddin Owaisi #Hyderabad (23.11.20) pic.twitter.com/XrIpVa6yks
— ANI (@ANI) November 24, 2020
यातच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन भाजपाचे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रचारावेळी बोलतांना ओवेसींनी शाह यांच्यावर रोहिंग्यांची मतदार यादीतील मुद्यावरून प्रश्न उपस्थितीत केला आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी
‘जर तुम्ही ३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एवढं सगळं होईपर्यंत झोपा काढत होते का?’
दरम्यान, नवनवे प्रदेश पादाक्रांत करण्यावर भाजपचा भर आहे. तेलंगणा हे त्यातील नवे इप्सित. डुब्बाक मतदारसंघातील विजयाने भाजपला तेलंगणा लक्ष्य करण्याचा आत्मविश्वास दिला आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांसाठी भूपेंद्र यादव यांची पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती. हेच यादव आताच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांत देखील भाजपचे प्रभारी होते. तेव्हा तेथील भाजपची कामगिरी पाहता यादव यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दुणावलेला असल्यास नवल नाही. यादवही हैदराबादमध्ये लगेच कामाला लागले आहेत आणि केवळ हैदराबाद महानगरपालिकेतच नव्हे, तर तीन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांतही भाजपच विजयी होईल अशी गर्जना केली आहे.