सहारनपूर – हरिद्वारमधील धर्मसंसद भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पार पडली आहे. देशात मुस्लिमांच्या हत्येची चर्चा होत असताना त्याविरोधात कोणी आवाज का उठवत नाही? असा सवाल एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला. तसेच “नरेंद्र मोदींचे तीन यार आहेत. नाटक, दंगल आणि अत्याचार’, असेही त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी बोलत होते. ओवेसी म्हणाले, नसीमुद्दीनचे नाव घेतले. मात्र कॉंग्रेस पार्टी तर बोलणार नाही. नसीमचे नाव घेतले तर आमची मतं मिळणार नाहीत. कॉंग्रेस इमरानचे नाव घेणार नाही.
समाजवादी पार्टी आझमचे नाव नाही घेणार. मात्र आम्ही अमित शहा आणि मुख्यमंत्री योगींना सांगू इच्छितो की, यूपीमध्ये योगी “राज’ (Raj) आहे. त्याचा अर्थ R (र) रिश्वत(लाच), A म्हणजे अपराध(गुन्हा) किंवा आतंक(दहशत), आणि J चा अर्थ जातीवाद. अमित शहा तुमचं कर्ज फिटलं.
दरम्यान, उत्तर प्रदेशात विधानसभेच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये निवडणुका होऊ शकतात. यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.