अलवर – येथील एक पुरातन मंदिर पाडण्यात आले, त्यावर देशभरातून उलट-सुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत. या शिवाय राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिव मंदिर पाडल्याच्या मुद्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर निशाणा साधत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माफी मागावी अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे. राजस्थानमधील जिल्ह्यातील राजगडमधील 300 वर्षांपूर्वीचे पुरतान शिव मंदिर पाडण्यात आले आहे. राजगडमधील प्राचीन मंदिर पाडणे हा भाजपशासित महापालिका मंडळाचा निषेधार्ह निर्णय आहे. आम्ही सर्व धर्मांच्या धर्म स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे या घटनेबाबत माफी मागावी असे त्यांनी म्हंटले आहे.
Condemnable decision by BJP-ruled Municipality Board to demolish a pracheen mandir in #Rajgarh, Rajasthan. We believe in freedom of religion for all religions, and this is a grave violation. Hope BJP-RSS apologises for its attacks on all places of worship pic.twitter.com/6qYlPEOuOA
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 22, 2022
तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने काँगेसवर टीका केली. भाजप नेते अमित मालवीय यांनी म्हंटले की हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. ही धर्मनिरपेक्षता आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली अलवर जिल्ह्यातील पुरातन असणारे 300 वर्षे जुने मंदिर पडल्याने हे नवीन प्रकरण सुरु झाले आहे.
राजस्थानमधील अलवरमधील राजगडमध्ये तीन मंदिरे पाडल्याची घटना समोर आली आहे. या मंदिरांमध्ये शिव, हनुमान तसेच इतर अनेक देवतांच्या मूर्ती होत्या. त्या तोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, मंदिराच्या गाभाऱ्याचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. तेथून विधीवत पुजा करुन मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. त्यांची विधिवत प्रतिष्ठापना देखील करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.