मुंबई – महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे प्रचंड नुकसान झाले. घरातील सामान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यांचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना बालभारतीने मोफत पुस्तके दिली आहेत अशी माहिती शिक्षण मंत्री ‘आशिष शेलार’ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यामुळे शालेय विध्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बालभारतीतर्फे पुरग्रस्त भागात पाठ्यपुस्तके तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मी दिले होते . आवश्यकतेनुसार पुस्तके वितरण वेगाने सुरु झाले आहे . सविस्तर माहिती खालील प्रमाणे!!! @Dev_Fadnavis @MahaDGIPR pic.twitter.com/XX4mlbqYDv
— ashish shelar (@ShelarAshish) August 17, 2019
राज्यातील अतिवृष्टीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून पुरामुळे त्यांच्या शालेय साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शाळेने गणवेश सक्ती करू नये, अशा सूचना देखील शेलार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.