नवी दिल्ली, दि. 16 – आजच्या तारखेला 2 लाख 11 हजार 33 जण करोना पॉझिटिव्ह असून हे रुग्ण गृह विलगीकरणात अथवा रुग्णालयात देखरेखीखाली आहेत. बरे झालेल्यांच्या संख्येने 1 कोटीचा आकडा पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत आहे. देशात सक्रीय रुग्ण संख्येत घट होत असल्याने 25 राज्यांमध्ये 5,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. या राज्यांमध्ये एकूण सक्रीय रुग्णांच्या केवळ 15 टक्के रुग्ण आहेत.
बरे झालेल्या पैकी 81 टक्के हे 10 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत. केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 4,603 जण करोनामुक्त झाले. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3,500 तर छत्तीसगड मध्ये 1009 जण बरे झाले. नव्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण 8 राज्यांमधील आहेत.
केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 5,624 नवे रुग्ण आढळले, महाराष्ट्रात 3,145 आणि पश्चिम बंगालमध्ये 708 नव्या रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात 175 मृत्यूंची नोंद झाली. यापैकी 69 टक्के सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 45 मृत्यूंची नोंद झाली. केरळ मध्ये 23 आणि पश्चिम बंगालमध्ये 16 दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.