नवी दिल्ली – देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ई- श्रम पोर्टल सुरू केले होते. याला कामगारांनी उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत या पोर्टलवर 27 लाख कामगारांनी नोंदणी केली आहे.
ही माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली. या कामगारांनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी याकरिता देशभरामध्ये शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या संदर्भात सकारात्मक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
राष्ट्रीय पातळीवर असंघटित कामगारांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारला मदत करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर या कामगारांना दोन लाख रुपयाचा अपघात विमा दिला जातो. पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला एक क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकाच्या आधारावर सरकारला या कामगारांना मदत करता येते.