नागपूर: “आमचं सरकार हे गोरगरिबांचे सरकार आहे. मी स्थगिती कुठेही दिलेली नाही आहे, चांगली कामे जी चालू आहेत तिथे पक्षाच्या पलीकडे जाऊन जी चांगली कामे आहेत त्या कामांना मी परवानगी दिलेली आहे आणि ती देत राहणार.”, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सभागृहात स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर जी यांनी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करावा आणि तात्काळ मदत देण्याबाबत निर्देशित करावे असे आवाहन केले.
तसेच विमा कंपन्यांनी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न दिल्याने रब्बी हंगाम २०१९ साठी या कंपन्यांच्या निवडीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२० पर्यंत वाढवावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, क्यार आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपन्यांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याने उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांना आढावा घेण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.