पाटणा – विधानसभा निवडणुकीच्या आधी पाच महिने जागा वाटप झाले होते. मात्र शत्रू आणि मित्रातील फरक मी ओळखू शकलो नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी केली.
विधानसभेच्या निवडणुकीत जनता दल संयुक्तला कमी जागा मिळाल्या. या पराभवाला लोकजनशक्ती पक्ष कारणीभूत नसून भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. समझ नही सके कौन दोस्त था और कौन दुष्मन। असे उद्वेगाने सांगून नितीशकुमार म्हणाले, पाच महिन्यांपुर्वी जागा वाटप झाले, त्यावेळी त्याचा लाभ आपल्याला मिळेल, असे वाटले होते.
पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. त्यात नितीशकुमार बोलत होते. ते म्हणाले, लोकजनशक्ती पक्षामुळे आपला पराभव झाला नाही. तर भाजपाने आपला पराभव अधोरेखीत केला. माजी मंत्री जय कुमार सिंह म्हणाले, “लोजप भाजप भाऊ भाऊ’ ही घोषणा माझ्या मतदारसंघात दिली जात होती.
सिंह हे दिनारा मतदारसंघातील उमेदवार होते. पक्षाच्या सर्वच पराभूत नेत्यांनी पराभवास भारतीय जनता पक्ष कारणीभूत असल्याचे सांगितले. लालू प्रसाद यांचे निकटवर्तीय आणि तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका राय हे जनता दल संयुक्तच्या उमेदवारीवर निवडणुकीस उभे होते. त्यांनीही आपल्या पराभवास भाजपाला जबाबदार ठरवले.
सुरवातीला मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार नव्हतो. पण पक्षातून आणि सहकारी पक्षांकडून दबाव आल्याने मी ते स्वीकारले. त्यामुळे भूतकाळ विसरून आपल्याला काम करायचे आहे. आपल्याल मते देणाऱ्या आणि न देणाऱ्यांसाठी काम करायला हवे. हे सरकार पाच वर्षाचा काळ पूर्ण करेल, असा विश्वासही नितीशकुमार यांनी व्यक्त केला.
एनआरसीला विरोधच
भारतीय जनता पक्षावर आणखी टीका करताना ते म्हणाले, बिहारमध्ये राष्ट्रीय पट नोंदणी (एनआरसी) बिहारमध्ये राबवू देणार नाही. तसा प्रयत्न केल्यास त्याला आम्ही नखशिखांत विरोध करू. बंगाल विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेते राष्ट्रीय पट नोंदणी, का कायद्याच्या बाजूने घसा फुटेपर्यंत ओरडत होते, अशी टीकाही भाजपाचा नामोल्लेख टाळून नितीशकुमार यांनी केला.