नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बदनामीकारक वक्तव्ये टाळावीत. अन्यथा ते आणखी अडचणीत येतील, असा इशारा भाजपने दिला.
राहुल यांना दोषी ठरवण्यात आल्यावरून कॉंग्रेसने टीकास्त्र सोडले. त्यानंतर भाजपच्या वतीने माजी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भूमिका मांडली.
निकालावरील टीका न्यायालयाचा अवमान ठरेल. कॉंग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचे त्यातून सूचित होते. त्या पक्षाला न्यायव्यवस्थाही स्वत:च्या खिशात ठेवायची आहे का, असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
Poster War In Delhi : आता दिल्लीत ‘केजरीवाल हटाओ’चे पोस्टर्स; BJPचे प्रत्त्युत्तर चर्चेत
लोकसभा सदस्य म्हणून राहुल यांना अपात्र ठरवले जाणार का, असा प्रश्न प्रसाद यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, तो निर्णय लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे.