मेढा – शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठींनी आम्हाला विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. आता मात्र आमच्याशी चर्चा करून चालणार नाही. ज्यांच्यासाठी मी राष्ट्रवादी पक्ष सोडला तेच भाजपमध्ये आले. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देताना बारकाईने विचार करावा अन्यथा मला लढण्यासाठी इतर मार्ग खुले आहेत. असा रोख-ठोक इशारा अमित कदम यांनी भाजपला देत शिवेंद्रसिंहराजेच्यावर निशाणा साधला.
माझी उमेदवारी माझी नसूनही जनतेची उमेदवारी असेल कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल असे कदम यांनी स्पष्ट करत कार्यकर्त्यांना वेट अँड वॉचचा इशारा दिला. आमदार शिवेंद्र राजेंच्या भाजप प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीला सुरुंग लागला असून सातारा जिल्ह्यतील बालेकिल्ल्यातील अभेद्य बुरुज जावळी भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे.
जावळीतील घड्याळाची टिकटिक’ बंद होण्याचा मार्गावर दिसत असताना राष्ट्रवादीची धुरा अमित दादा कदम यांच्या खांद्यावर येईल असा अंदाज बांधला जात आहेत. सातारा जावळी मतदार संघाचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजेंच्या भाजपा प्रवेशामुळे जावळीसह सातारा जिल्ह्यातील राजकारणात उलथा-पालथ झाली असून आता जावळीतील कोणते कोणते नेते आमदार शिवेंद्रराजेंसोबत बंडखोरी करणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
येत्या निवडणुकीत सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून कडवे आव्हान उभारण्याची रणनिती अमित कदम व कार्यकर्त्यांनी आखली आहे. अमित कदम अभी नही तो कभी नही अशी भुमिका घेणार असल्याने, जावलीतील राष्ट्रवादीसह भाजपाचाही मोठा गट अमित कदमाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. अमित कदम यांनी मी लढणारच अशी भूमिका घेतल्यामुळे भाजप समोर एक कडवे आव्हान उभे केले असून पक्षश्रेष्ठींना उमेदवारीबाबत अवघड आव्हान रहाणार आहे.
तसेच अमित कदम यांच्याकड़े या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केल्यास मी अजूनही भाजप पक्षात आहे. काही व्यक्तींच्या व्यक्तिगत विरोधासाठी मी राष्ट्रवादी पक्ष सोडला होता, आता तेच व्यक्ती भाजपमध्ये आल्याने पक्षश्रेष्ठींनी बारकाईने विचार करून उमेदवारी द्यावी. अन्यथा मला लढण्यासाठी इतर मार्ग सुध्दा खुले आहेत. लवकरच सर्व कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
पाटण तालुक्यात डोंगर खचला
मेढोशी, ता. पाटण येथील गावाच्या बाजूस असणाऱ्या बोर्गेवाडी या गावच्यावरीलबाजूस असणारा डोंगर खचला आहे. 31 जुलै रोजी रात्री घटना घडून गावची पाहणी करण्यासाठी कोणीही विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे अथवा तहसिलदार रामहरी भोसले हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असणारे अधिकारी याठिकाणी पोहचले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. आमच्या जीवीतास धोका असून शासनाने आमची दखल घेतली नाही तर तहसिल कार्यालयात तळ ठोकू असा इशारा दिला आहे. गेल्या वीस वर्षापासून बार्गेवाडीच्या पुर्नवसानाचा प्रश्न रखडला आहे. स्थानिक पातळीवर कोणताही अधिकारी आमची दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमची दखल घेत नसाल तर तहसिल कार्यालयात राहुट्या उभारु, असाही इशारा ग्रामस्थांनी दिला.